राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रित रणनीत...
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रित रणनीती ठरवली आहे. महायति सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई महानगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवली जाईल.
मात्र, इतर महानगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये हे तीन पक्ष वेगवेगळे उमेदवार रिंगणात उतरवतील. निवडणुकीनंतर मात्र हे पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला महायुतीकडून विशेष महत्त्व दिलं जात आहे. मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून, येथील सत्तेचा ताबा मिळवणे प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा मिळाल्याने ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. त्यामुळे महायुतीने येथे एकजूट दाखवून एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना संकेत दिले की, मुंबईत तिन्ही पक्ष एकत्र येतील. परंतु उर्वरित ठिकाणी युती करायची की स्वतंत्रपणे लढायचं, याचा निर्णय स्थानिक समीकरणांनुसार घेतला जाईल.
ठाणे महानगरपालिकेतील परिस्थिती मात्र वेगळी आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढत केली होती. त्यामध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. सध्या ठाण्यात शिंदे गटाची ताकद वाढलेली असून, त्यांच्याकडे ८५ माजी नगरसेवक असल्याचं सांगितलं जातं. भाजपकडे २३ माजी नगरसेवक आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिंदे गट वेगवेगळे लढले तर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. भाजपचे स्थानिक नेते, खास करून आमदार संजय केळकर आणि गणेश नाईक, हे ठाण्यात शिंदे गटासमोर आव्हान उभं करत असल्याचं दिसतं. त्यामुळे जर हे पक्ष स्वतंत्रपणे लढले, तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला (मविआ) होऊ शकतो.
महायुतीची ही नवीन रणनीती म्हणजे निवडणुकीपूर्वी स्पर्धा करून, निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा फॉर्म्युला आहे. ही रणनीती काही ठिकाणी फायदेशीर ठरू शकते, परंतु ठाण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी ती उलटीही पडू शकते. सर्वसामान्य मतदारांसाठी ही निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक प्रशासकीय सत्तेचा निर्णय नसून, राज्यातील राजकीय समीकरणांची चाचपणीही ठरणार आहे.
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रित रणनीती ठरवली आहे. महायति सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई महानगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवली जाईल. मात्र, इतर महानगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये हे तीन पक्ष वेगवेगळे उमेदवार रिंगणात उतरवतील. निवडणुकीनंतर मात्र हे पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.


COMMENTS