अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२५ चे आयोजन दि. २१, २२, २३ फे...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२५ चे आयोजन दि. २१, २२, २३ फेब्रु २०२५ देशाची राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आले होते.
या संमेलनाची सुरुवात साहित्य ग्रंथदिंडी(पंढरपूर ते दिल्ली), चित्ररथ, कलापथक वाजत गाजत ढोल ताश्यांच्या गजरात झाली. भारतातील कानाकोपऱ्यातून आलले हजारो मराठी साहित्य रसिक प्रेमी उपस्थित राहून दिल्लीत ७० वर्षांचा इतिहास जागा केला.
या संमेलन प्रसंगी उपस्थित पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जैन धर्माच्या णमोकार मंत्राने सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी स्वागताध्यक्ष मा.शरद पवार साहेब होते, प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, संमेलन अध्यक्षा मा.डॉ.तारा भवाळकर, मा. संजय नहार, मा.उषा तांबे, मा.रविंद्र शोभणे असे मान्यवर उपस्थित होते.
या अखिल भारतीय मराठी संमेलनात पंढरपूर येथील ' नवनीत प्राथमिक विद्यालय इसबावी' मधील शिक्षिका, कवयित्री सौ. वीणा सारंग व्होरा, पंढरपूर, जि.सोलापूर येथील रहिवासी असून पंढरपूर ते दिल्ली या पंढरपूरची वारी साहित्याच्या दारी या यात्रीदिंडीत तुळस घेऊन साहित्यिक वारकऱ्यासमवेत सहभाग घेतला होता. राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम दिल्ली
येथील श्रीमंत सयाजीराजे महाराज गायकवाड सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज विचार पीठावर सौ.वीणा सारंग व्होरा यांनी अस्तित्व ही स्त्री मन मांडणारी कविता सादरीकरण केली.उपस्थितांची मने जिंकली.
छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ या सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे संस्थापक अभिनेते डॉ.शरद गोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार ,युवराज नळे डॉ.पोपेरे, संजय आवटे, रामदास मोरे( तुकाराम महाराज वंशज), मा. फुलचंद नागटिळक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी
जितेंद्र कांबळे सर (आळेफाटा), आकाश कुंभार, डॉ.विजय पोपेरे (अकोले), नितीन पाटील सोलापूर, हेमंत चिकणे,हर्षदा गुळमिरे,सुषमा आलेकर, यशवंत घोडे जुन्नर, सुवर्णा तेली, अलका नाईक (मुंबई), लक्ष्मण हेंबाडे, आदेश फुलगे, संदीप तोडकर, तुकाराम जेगोले, माणिकराव गोडसे तुकाराम मोरे, देवदत्त बोरसे , तोरस्कर, सुवर्णा वाघमारे, आकाश वानखेडे यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव अशा अनेक भागांतून आलेल्या निमंत्रित कवींच्या कविता सादर झाल्या .
दि २१ ते २३ फेब्रुवारी ग्रंथदिंडी,मुलाखत, परिसंवाद, लोकसाहित्य, कविसंमेलन, कवी कट्टा, एकपात्री नाटृय सादरीकरण झाले . खासदार सुप्रिया ताई सुळे, मा.सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री मा.अजितपवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत ,मा.विजय दर्डा लोकमत वृत्तपत्र साहित्य संमेलनासाठी भारतातील असंख्य मराठी साहित्य प्रेमी उपस्थित होते .
COMMENTS