प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभाग, मराठी वाड:मय ...
प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभाग, मराठी वाड:मय मंडळ अंतर्गत दि २६ ते २८ फेब्रु २०२४ या कालावधी प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे कवी श्री तानाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे होते तर अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी व कला शाखाप्रमुख डॉ. अभिजीत पाटील, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. सतीश जाधव आणि मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना नढे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .प्रमुख पाहुणे श्री.तानाजी बोऱ्हाडे यांनी कवितेची संकल्पना,कवितेचा इतिहास सांगून आपल्या 'अग्रणी उत्कृष्ट ग्रामीण वांडमय पुरस्कार' मिळालेल्या 'जळता भुई पायतळी' या कवितासंग्रहातील कवितांची पार्श्वभूमी सांगून कवितांचा गर्भार्थ विद्यार्थ्यांसमोर कथन केला आणि कविता वाचन सादर केले .प्रेमकवितेने सुरुवात करून माय,माती,बदललेल्या ग्रामजीवनापर्यंत अनेक समाजातील ज्वलंत विषय त्यांनी आपल्या कवितांमधून मांडले. समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून लेखक ,कवींनी हे विषय लिहिले पाहिजेत असेही ते म्हणाले .तर अध्यक्ष मनोगतात प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे म्हणाले ' मराठी भाषेमुळे आपले जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे .तसेच विद्यार्थ्यांनी मराठी कवितेतून प्रेरणा घेऊन आपणही डोळसपणे समाज निरीक्षण केले पाहिजे, आपल्यालाही समाजाचे प्रश्न व मानवी भावना प्रभावी पणे मांडता आल्या पाहिजे असे सांगितले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना नढे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ वर्षा देसाई तर आभार प्रदर्शन प्रा. विष्णू घोडे यांनी केले.
COMMENTS