आज दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी, शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा सोमतवाडी ता. जुन्नर, जि .पुणे येथे आश्रमशाळेतील / वसतीगृहा...
आज दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी, शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा सोमतवाडी ता. जुन्नर, जि .पुणे येथे आश्रमशाळेतील / वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबत माहिती देणे व साहित्य देणे या योजनेअंतर्गत विघ्नहर मेडिकल फाऊन्डेशन, नारायणगाव " शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पांतर्गत " सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार, उपचार, जनजागृती अभियानाअंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . यावेळी विद्यार्थ्यांना सर्पदंश जनजागृती अंतर्गत माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. सदानंद राऊत MD. (Gen. Med.) व डॉ. पल्लवी राऊत DM&S यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. सदानंद राऊत यांनी विद्यार्थ्यांना जगामध्ये तसेच भारतामध्ये होणाऱ्या सर्पदंशाची माहिती सांगितली. जगाच्या तुलनेत भारतातील सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचा वाढीव दर याविषयी माहिती सांगितली. तसेच सर्पदंश टाळता येऊ शकतो, त्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे; सर्पदंश झाल्यावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती सांगितली. डॉ.राऊत सरांनी विषारी साप नाग, मण्यार, घोणस फुरसे यांची माहिती सांगितली.विषारी साप चावल्यामुळे शरीरावर कोणते कोणते परिणाम होतात हे सांगितले. ग्रामीण, डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. अशा वेळी सर्पदंश झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वेळेत योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सदानंद राऊत यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे. डॉ.पल्लवी राऊत मॅडम यांनी बिनविषारी सापांचे प्रकार स्पष्ट केले व ते कोठे आढळतात, विषारी साप व बिनविषारी साप ओळखण्याची लक्षणे, सर्पदंशाची लक्षणे कोणती असतात त्याचप्रमाणे सर्पदंशावरील उपचार याविषयी माहिती दिली. सर्पदंश झाल्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय घेतले पाहिजेत, सर्पदंशावर प्रथमोपचार कोणते करावे, आवळपट्टी (tourniquet) कशी बांधायची, आता जे नवीन संशोधन आले त्यातील स्मार्ट बँडेज कशा पद्धतीने बांधायचे याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले.
आपल्याकडे पावसाळ्यात सर्पदंशाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे, त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भयाने आणि अंधश्रद्धेमुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी सर्पदंश होऊ नये म्हणून नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी हे सांगितले. सदर प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. सदर कार्यक्रम प्रसंगी श्री दत्ता गवारी, डॉ. सुप्रिया, डॉ. श्री जगदाळे, श्री.अशोक लांडे, श्री .यश मस्करे , प्राचार्य श्री .विलास साबळे व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS