गुरूपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा... आषाढ शुध्द पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व...
गुरूपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा...
आषाढ
शुध्द पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत,
पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन
आहे.
आपल्या
देशात रामायण-महाभारत काळापासून गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण
ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा
उध्दार करत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले
आद्य कर्तव्य होय.
आपण
कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरूपरंपरेत
गुरू-शिष्यांच्या जोड्या प्रसिध्द आहेत. जन-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक,
कृष्ण-सुदामा, सांदिपनी- विश्वामित्र, राम-लक्ष्मण, परशुराम-कर्ण,
द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरू-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरूनिष्ठा पाहिली
की आपण भारावून जातो.
भगवान
श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू
निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरू मानले. तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी संवाद साधत
असत. त्या नामदेवाचे गुरू सुध्दा विसोबा खेचर हे होते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत
गुरू-शिष्य परंपरेला विशेष
महत्व आहे. गुरूंच्या कृतज्ञतेबद्दल असे म्हटले जाते.,
गुरूर्ब्रम्हा गुरर्विष्णु गुरूर्देवो
महेश्वर
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम
गुरू
या शब्दाची फोड केल्यावर गुरूचा अर्थ गु म्हणजे ज्ञान आणि रू म्हणजे ज्ञान देणारा
त्यामुळे ज्ञान देणारा म्हणजे गुरू अशी गुरूंची व्याख्या केली जाते.
जुन्या
काळामध्ये गुरू- शिष्य परंपरा होती, गुरूकुल शिक्षण पध्दतीत शिष्य गुरूंकडे शिक्षण
घेण्यासाठी जायचे. मात्र काळाच्या ओघात ही गुरूकुल शिक्षण पध्दत नष्ट झाली. आणि
त्याची जागा आज शाळ, कॉलेज व महाविद्यालयाने घेतली.
गुरुकुल
शिक्षण पध्दतीत मुक्त शिक्षणाला महत्व होते. असेच एकदा तीन शिष्य गुरूच्या दरबारी
शिक्षण घेण्यासाठी जायचे, वर्षभर गुरूने शिष्यांना शिकवले, शेवटची परिक्षा घेतली
ती परिक्षा म्हणजे तुम्ही आता इथून बाहेर पडाल, तेव्हा नेहमी समाजहीत डोळ्यासमोर
ठेवा. लोकांना त्रास होईल असं वागू नका आणि आता जा...असा संदेश गुरूंनी आपल्या तीन
शिष्यांना दिला आणि शिष्य बाहेर पडले तेव्हा खूपच अंधार पडू लागला होता. त्यावेळी
तीनही शिष्य जोरजोराने पळत आपल्या घराकडे सुटले, कारण त्यांना घर गाठायचे होते.
परंतु मध्येच त्यांना नदी ओलांडावी लागली, ते उड्या मारून नदीच्या पलिकडे गेले.
नदी पार केल्यानंतर त्यांना रस्त्यातच काटेरी फेस पडलेला दिसला. दोघांनी लांबून
पळत येऊन उड्या मारल्या तिसरा मात्र त्या रस्त्यात पडलेल्या काट्यांना वेचू लागला.
त्या दोघांनी पाहिले आणि ते त्याला म्हणाले, हे काय करतो. आपल्याला घरी जायला वेळ
होतो आणि तु मात्र काटे वेचतो, तेव्हा त्याने अतिशय मार्मिकपणे उत्तर दिले तो
म्हणाला तुम्ही जा मी हे काटे वेचून परत येतो. कारण या रस्त्यावरून माझ्यासारखे
असंख्य वाटसरू येतील तेव्हा त्यांच्या पायात काटे मोडतील, मग ते दोघे त्याला
म्हणाले, तुला तुझी काळजी नाही त्या अनोळखी वाटसरूंची काळजी वाटते. असे म्हणून ते
निघून गेले. हे सर्व घडताना गुरू एका झाडाच्या आडून हे सगळे पाहत होते. दोन शिष्य
पळत असताना गुरूंनी त्यांना अडवले आणि म्हटले थांबा...तुमचे अजून शिक्षण अपुरे
आहे. आणि ते तिसऱ्या शिष्याजवळ गेले आणि त्याला कडकडून मिठी मारली. तुच माझ्या
कसोटीस उतरला आहेस असा गुरूने त्याला आशिर्वाद देवून पुढील प्रवासास जायला
सांगितले.
तात्पर्य-
एके काळी गुरू-शिष्याचे नाते सातासमुद्रापार होते, परंतु आज आपण पाहतो की,
प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी जीवावर मोठी होत असते. असो, परंतु सांगण्याच
तात्पर्य एवढचं की, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जगताना गुरू असावा लागतो.
प्रत्येकाच्या
आयुष्याला वेगळी कलाटणी देणारे सगळ्यात महत्वाचे गुरू म्हणजे आपले आई-वडील,
ज्यांच्यामुळे आपण जग पाहिले, हीच गोष्ट आज आपण विसरत चाललो आहोत. आई-वडीलांनंतर
शिक्षक महत्वाचा गुरू आहे, मित्रमैत्रिणी असे प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी
गुरू असतोच.
आजच्या
गुरूपौर्णिमेनिमित्ताने खरं तर आपल्या राष्ट्राला ज्यांनी घडवले ते सर्वच
महापुरूष, क्रांतिवीर यांच्यामुळेच आपण आज जीवन जगतोय ते ही सुखाने अन्यथा
गुलामगिरीचे जीणे आजही आपण पाठीवर घेऊन फिरत असतो.
भारतीय
परंपरेला मोठा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी गडकिल्ले जिंकून दिले, महात्मा फुले
यांनी मुलींसाठी पहिली शाळा खुली केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय
राज्यघटना दिली, महात्मा गांधींनी अहिंसा दिली, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी
देशासाठी बलिदान दिले. शाहू राजांनी इथल्या गोरगरीब जनतेला न्याय दिला. प्रत्येक
महापुरूष हाच आपल्या सर्वांचा गुरू आहे. असे अभिमानाने सांगावेसे वाटते.
आज
आपण पाहतो की, जातीयवाद, धार्मिकवाद या गोष्टींचा विपरित परिणाम खरंतर शालेय,
महाविद्यालयीन मुला-मुलींवर होताना दिसत आहे. यांतून आपण कसे बाहेर पडू शकतो याचा
सर्वच विद्यार्थी आणि पालकांनी विचार केला पाहिजे. आपण जास्तीत-जास्त वाचण-लिखाण
केले पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला घडवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या
सर्वांना या गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा...
सरते
शेवटी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शब्दात...
विद्येविना मती गेली, मतीविना
नीति गेली, नीतिविना गती गेली
गतीविना वित्त गेले, वित्ताविना
शूद्र खचले इतके अनर्थ एका
अविद्येने केल.
म्हणजेच
प्रत्येकाने अज्ञानरूपी राक्षस दूर करून ज्ञानरूपी ज्योत पेटवूया...
धन्यवाद...
लेखक-
प्रा. सतिश शिंदे-एम. ए. राज्यशास्त्र, पत्रकारीता.
लेखक
हे दैनिक प्रभात, हेल्लो महाराष्ट्र, वन इंडिया टि. व्ही चॅनल, स्ट्रॅटेजी
कन्सल्टंसी राजकीय संस्था येथे कार्यरत होते.
सध्या
ते क्राईमनामा Live या
अधिकृत वेबसाईटचे मुख्य संपादक असून ते पुढील लेखन करत आहेत.
सामाजिक, राजकीय लेखन.
संशोधन- दलित चळवळ एक शोध
COMMENTS