वेदनेचा हंबरडा.... ही कथा सत्यघटनेवर आधारीत आहे. सुरूवातीलाच मी सर्वांना सांगू इच्छितो की , कुठलीही स्त्री ही आपल्या आयुष्याला एक वळण देणा...
वेदनेचा हंबरडा....
ही कथा सत्यघटनेवर आधारीत आहे.
सुरूवातीलाच मी सर्वांना सांगू इच्छितो की, कुठलीही स्त्री ही आपल्या
आयुष्याला एक वळण देणारी असते,
म्हणून भारतीय परंपरेनुसार
स्त्रीला देवीचे स्थान दिले जाते. सांगण्याचा उद्देश एवढाच प्रत्येक व्यक्ती हा
आपल्या आयुष्यामध्ये स्त्रीला कशाप्रकारे वागणूक देतो....यावर आपले स्थान ठरते.
मित्रांनो ही गोष्ट आहे ससून
रुग्णालयातील, रुग्णालय म्हटले की, भीतीचे वातावरण हे ठरलेले असते.
कारण, तिथे प्रत्येकजण हा वेदनेलाच सामोरा जात असतो. तिथे
विविध प्रकारचे रुग्ण आढळतात,
विचित्र प्रकारचे आवाज येतात, असाच एक दिवस
मी माझ्या मामांना दवाखान्यात भेटावयास गेलो असताना शेजारीच बाहेरच्या बाजूला एक
रडवेला आवाज येत होता. तसाच त्या आवाजाच्या दिशेने मी तिथे गेलो तर तिथे घोळक्याने
पंधरा वीस स्त्रीया बसलेल्या होत्या. त्यांच्यामध्ये वीस ते तीस अशा वयाची एक ताई
हंबरडा फोडून रडत होती. बाकी लोक तिला आधार देत होते, गप बाई आता
काय ते परत येणार थोडीच....रडून काय होणार आपल्या हातात काय आहे....ताईचा आवाज
भल्याभल्यांना टाहो फोडत होता. अशातच मला काही राहवलं नाही म्हणून मी कुणाला तरी
विचाराव म्हणून पुढे जात होतो माझ काही धाडस होईना विचारायला एवढा मोठा आघात त्या
आईला झालेला होता. मी तिथे जवळच असलेल्या सिक्युरिटी गार्डला विचारले काय झाले आहे
त्या ताईंना सिक्युरिटीचे उत्तर आरे पोर मेलय त्या बाईच.....हे उत्तर ऐकूण माझ्या
काळजात धस्स झालं....सिक्युरिटीचे हे उत्तर म्हणजे त्याच्या उध्दटपणाचे लक्षण
असावे....कारण, त्या ताईच्या बाळाचे निधन झालेले होते. आणि हा
सिक्युरिटी अशा प्रकारची भाषा करतो म्हणजे काय एवढी माणसाच्या माणुसकीची पातळी
खाली जाते....म्हणजे काय? त्या ताईचे रडून रडून डोळे सुजले होते. सकाळपासून पोटात
अन्न नव्हते. सर्वजण उपाशीच होते. कुणालाही भुकेचा, तहाणेचा काहीच पत्ता नव्हता, गरीब
कुटुंबातील हे लोक या हॉस्पिटलमध्ये आले होते. ताईला पोटचा गोळा हे जग सोडून निघून
गेलेला होता. एका आईच्या भावना तिलाच माहिती किती वेदना, किती
दुख....हे शब्दात नाही सांगू शकत.
मी त्या घोळक्यात पुढे गेलो
ताईला मायेचा हात दिला आणि तिला आधार मिळाल्यासारख झालं मलाही याचेच समाधान झाले
की, आपण या गरीब कुटुंबाला आधार देत आहोत सर्वजण पहात होते.
कोण, कुणाचा,
कसा, काय, या सर्वांची
उत्तरे शोधण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही जणू काही मी त्यांच्याच कुटुंबाचा सदस्य
होतो...ताईने अजून जोरात रडायला सुरुवात केली. तशा माझ्या डोळ्यांच्या कडा
पाणावल्या...आणि शब्द कानावर पडला. माझं बाळ मला सोडून गेल..कोण देणार माझ्या
बाळाला अन्न, कोण देईल त्याला आधार, या वाक्याने मी बाकी भारावून
गेलो.
साधारण आठ ते नऊ वर्षाचा बाळ
त्या मातेला या जगातून सोडून निघून गेले होते. तिकडे दुसरीकडे दवाखान्याच्या
गाडीवाल्याची व काही कार्यकर्त्यांची चर्चा चालली होती.परवडत नाही राव...हजार
रूपयामध्ये, दोन हजाराच्या खाली मी येणार नाही हे कुटुंब मुळातच
कुठलेतरी लांबचेच होते. ड्रायवर बोलत होता. बघा तुम्हाला कोणी नेतो का नाहीतर दोन
हजार रूपये द्या तेव्हा मी येतो. गाडी ठरली. ताईला लांब कुठेतरी बसविले आणि
गाडीमध्ये बाळाचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले तशी ती ताई त्या गाडीकडे धावत आली आणि
गाडीवर डोक आपटायला लागली. चार पाच घरातील कर्ते सवरते पुरुष तिला बाजूला घेऊन
गेले. गाडी सुरू झाली. गाडीत ती ताई व घरातील इतर माणसे बसली. इतर माणसे
दुसऱ्या गाडीतून गेले.
खरं तर ही कथा सांगण्यामागचा
हेतू एवढाच की, कुठलीही आई असो तिला आपल्या बाळाचा अभिमान असतो. मग तो
प्राण्यांच्या मध्ये देखील दिसून येतो गायीला वासराला चाटल्याशिवाय बरं वाटत नाही.
तसेच आईने बाळाला जवळ घेतल्याशिवाय बरं वाटत नाही. तोच प्रसंग त्या ताईवर आलेला
होता. एकतर त्या सिक्युरिटीचे उत्तर ऐकून कुणालाही वाटेल की, इतकी माणुसकी
खालच्या पातळीवर आली आहे का? नाही ना मग प्रत्येकाला त्याच वाटेवरुन जायचे आहे.
म्हणून दुखाचा प्रसंग असो की,
संकटे असो ही काही काळासाठी
प्रत्येकावर येणार असतात परंतु त्यामध्ये एकमेकाला पैशाची नाही तर सगळ्यात मोठ्या
शाब्दीक आधाराची गरज असते.
संध्याकाळी माझ्या बाळाला
जाळण्यात येणार आहे. आणि मी मात्र कशासाठी जगू अशाच भावना त्या ताईच्या चेहऱ्यावर
दिसत होत्या. मला मात्र एक जाणवल की, मी आज आयुष्यात सगळ्यात मोठ काम
केल की, या गरीब कुटुंबाला मायेचा आधार दिला, विचारपूस
केली. किती मोठ कार्य....आणि हेच कार्य पुढे देखील कराव असेच मनातून सारख सारख
वाटते.
मित्रांनो आजचा दिवस जरी आपल्या
हातात असला तरी त्या आजच्या दिवसात आपण कुणाला किती आनंद दिला कुणाला किती दुख
दिले, हे सर्वांनी पाहिले पाहिजे. कारण, प्रत्येकाला
हे तर नक्कीच माहिती आहे की, आपणही त्याच वाटेवरचे वाटसरू आहोत.....म्हणून सर्वांना
एक सुंदर संदेश जगावे असे की चारचौघात नाव निघावे आणि मरावे असे की
प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूचे पाझर फुटावे.
आवडले तर नक्की कळवा....
तुमचाच मित्र सतिश संतोष शिंदे.
COMMENTS