आपण देशाचे सुजाण नागरिकांपैकी एक म्हणून जगाच्या लोकसंख्येत गणले जातो. व्यक्तीचे चार टप्प्यात वर्गीकरण करूया. ज्यामध्ये बालपण, किशोरपण, तरु...
आपण देशाचे सुजाण नागरिकांपैकी एक म्हणून जगाच्या लोकसंख्येत गणले जातो. व्यक्तीचे चार टप्प्यात वर्गीकरण करूया. ज्यामध्ये बालपण, किशोरपण, तरुणपण, आणि वृद्ध.
बालपणात मुल जन्मापासून ते साधारणतः 14 वर्षापर्यंत नवनवीन गोष्टी शिकत असते.अनुकरण करत असते. जे वय खेळण्याबागडण्याचे असते.
किशोरपण ज्यामध्ये थोडासा अल्लडपणा,थोडीशी समज, जगाच्या समोर आपण कसे वागावे,आपले योग्य अयोग्य यांची पारख करून चांगल्या वाईट गोष्टी अंगीकारत असते. हे जग रमणीय स्वप्न पाहणारी कल्पनांचे जग असते. त्यातच ते शिक्षणाबरोबर बाहेरील गोष्टी अंगीकृत करत असते. कळतं नकळत होणाऱ्या चुकांतून ते सावरत असते.
तरुणपण म्हणजेच देशाचा तरुण भावी नागरिक. ज्यांच्या हातात संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी येऊ शकते. जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या कार्यातून देशसेवा करत असतात. ज्यामध्ये वेगवेगळी पदे,सरकारी वर्ग,पोलिस,सैनिक,शिक्षक,मंत्री,पत्रकार,डॉक्टर,वकील,सरकारी कर्मचारी वर्ग,खासगी वर्ग ज्यात व्यावसायिक,नोकरदार वर्ग,शेतकरी,कामगार वर्ग यांचा समावेश होतो. खरेतर खरा स्वाभिमान व एक सुजाण नागरिक बनतो तो इथेच. वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक लोक हे काम करत असतात. आपल्या लेकरांच्या व स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजांसाठी धडपडत असतात. संपत्ती ही माणसाला लाभलेली एक अशी गोष्ट आहे जी सामान्य माणसाची गरज भागवते.त्याचाच अतिरेक झाल्यास संपूर्ण आयुष्य उध्वस्त ही करते. माणूस धडपडत असतो तो पैशासाठी. खूप कमी जण प्रामाणिकपणे तो कमावतात. तर काही फसवणूक करून फक्त खिसे भरतात. “आजच्या जगात पैसा असल्याशिवाय पान हलत नाही.” हे जितके खरे आहे तितकेच " फुकट मिळालेला पैसा फार काळ टिकत नाही.” हे देखील तितकेच खरे आहे. पण आज या स्वाभिमानाची प्रामाणिकतेची काडीमात्र जाण माणसाला नाही. गरजेपेक्षा अधिक हाव हा माणसाचा दोस्त बनून तोच खरा शत्रू बनला आहे. कोणतही माणसाच पद घ्या माणूस पैसा कमावतो आणि पैसा कमावला की गरीबांना लुटतो.आणि त्यांचा हेवा करतो. पैसे कमावणारा,उच्च पदस्थ असलेला व्यक्ती मोठा मानला जातो. आज सरकार ज्याच्या हाती त्याच्या हाती सत्ता. चूक करणाऱ्या व्यक्ती बाजूला राहून निष्पाप व्यक्ती गुन्हेगार ठरली जाते. आज सरकारी माध्यमे म्हणा शिक्षक,डॉक्टर,वकील,किंवा अन्य या सर्वांत कुठे न कुठे भेसळ किंवा लोकांची फसवणूक ही चालू असते. यात आपले देशाप्रेम दिसत नाही. खुप कमी जण असतात जे स्वाभिमान प्रामाणिकता यांना कायम जपतात. आपल्या कामासोबत छेडछाड करत नाही.
आज तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी. काही ही करू शकता. पण खरी प्रामाणिकता आपल्या स्वभावात आहे.स्व अभिमान,अन्यायाच्या विरोधात बोलणारा, आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेला असा एक स्वाभिमानी पुरुष आज हरवला आहे.खूप कमी लोक असतात जे आपल्या स्वाभिमानासाठी कधीच दुसऱ्यापुढे झुकत नाही.
म्हणूनच देशाचा एक सुजाण नागरिक बनतो तो इथेच.
धडपडत असतात. संपत्ती ही माणसाला लाभलेली एक अशी गोष्ट आहे जी सामान्य माणसाची गरज भागवते.त्याचाच अतिरेक झाल्यास संपूर्ण आयुष्य उध्वस्त ही करते. माणूस धडपडत असतो तो पैशासाठी. खूप कमी जण प्रामाणिकपणे तो कमावतात. तर काही फसवणूक करून फक्त खिसे भरतात. “आजच्या जगात पैसा असल्याशिवाय पान हलत नाही.” हे जितके खरे आहे तितकेच " फुकट मिळालेला पैसा फार काळ टिकत नाही.” हे देखील तितकेच खरे आहे. पण आज या स्वाभिमानाची प्रामाणिकतेची काडीमात्र जाण माणसाला नाही.
गरजेपेक्षा अधिक हाव हा माणसाचा दोस्त बनून तोच खरा शत्रू बनला आहे. कोणतही माणसाच पद घ्या माणूस पैसा कमावतो आणि पैसा कमावला की गरीबांना लुटतो.आणि त्यांचा हेवा करतो. पैसे कमावणारा,उच्च पदस्थ असलेला व्यक्ती मोठा मानला जातो. आज सरकार ज्याच्या हाती त्याच्या हाती सत्ता. चूक करणाऱ्या व्यक्ती बाजूला राहून निष्पाप व्यक्ती गुन्हेगार ठरली जाते. आज सरकारी माध्यमे म्हणा शिक्षक,डॉक्टर,वकील,किंवा अन्य या सर्वांत कुठे न कुठे भेसळ किंवा लोकांची फसवणूक ही चालू असते. यात आपले देशाप्रेम दिसत नाही. खुप कमी जण असतात जे स्वाभिमान प्रामाणिकता यांना कायम जपतात. आपल्या कामासोबत छेडछाड करत नाही. पैसा संपत्ती ची हाव माणसाला विनाशाकडे नेते.आपण इतरांचे चांगल्या गोष्टींचे अनुकरण केले तर निश्चितच फायदा आहे. परंतु एक जण वाईट गोष्टी अवलंबतो मग ”मी एखाद्या वेळेस चुकीचा मार्ग वापरला तर काय बिघडणार आहे.” ही विचारसरणी वाईटाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. चांगल काम तुम्ही काय करता हे कुणी विचारत नाही. तुम्ही पैसा किती कमावता हे समाजासाठी महत्त्वाचे असते. पण तो पैसा आपण समजकदूनच अनिनितेने कमवत असतो की कसा याचे समाजाला घेणे नसते. परंतु म्हणून प्रत्येक वेळी पैशाकडेच धाव घेवून आपण आपले अस्तित्व मिळवत असतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला हवा असणारा वेळ आपण फक्त कमावण्यात घालवत असतो.
हल्ली मात्र सगळीकडे भ्रष्टाचाराचे राज्य दिसायला भेटतेय. राजकारण,अर्थकारण,समाजकारण,व्यावसायिकरण सगळीकडेच तीच परिस्थिती पाहायला मिळते. पण अशा गोष्टींमुळे संपूर्ण क्षेत्र व व्यक्ती नाहक बदनाम होतात.
आज तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी. काही ही करू शकता. पण खरी प्रामाणिकता आपल्या स्वभावात आहे.स्व अभिमान,अन्यायाच्या विरोधात बोलणारा, आपल्या कामाशी एकनिष्ठ असलेला असा एक स्वाभिमानी पुरुष आज हरवला आहे.खूप कमी लोक असतात जे आपल्या स्वाभिमानासाठी कधीच दुसऱ्यापुढे झुकत नाही.
म्हणूनच देशाचा एक सुजाण नागरिक बनतो तो इथेच.


COMMENTS