नागपूर: माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील रा.सू. गवई हे अनेक वर्ष राजकारणात होते. त्यामुळे निवृत्तीनंतर भूषण ग...
नागपूर: माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील रा.सू. गवई हे अनेक वर्ष राजकारणात होते. त्यामुळे निवृत्तीनंतर भूषण गवई राजकारणात जाणार का? अशा चर्चा अनेकदा रंगतात.अशातच गवईंनी व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभर कौतुक केले. तसेच नक्षलवाद संपवण्यात आणि विकासाचे श्रेय त्यांना दिले. त्यामुळे गवई राजकारणात जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधान आले. गवई यावेळी फडणवीसांविषयी नेमके काय म्हणाले पाहूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे दहा पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
काय म्हणाले गवई ?
गडचिरोली यांनी गोंदिया जिल्हा अनेक वर्ष नक्षलग्रस्तांनी ग्रासलेला होता. त्या भागात विकास करणे अशक्य होते. कुठला एखादा उद्योग किंवा खाण उद्योग सुरू झाला तर अशा उद्योगपतींचा नक्षलवाद्यांकडून खून केला जात होता. आज आपल्या देशाने फार मोठी प्रगती केली असली तरी अनेक असे विभाग हे नक्षलग्रस्त भागामुळे विकासापासून वंचित राहिले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येणार होते, पण ते काही करण्याचे येऊ शकले नसले तरी मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. आज त्यांच्या पुढाकारामुळे गडचिरोली आणि गोंदियामधील नक्षल प्रभाव हा संपल्यात जमा आहे. आज गडचिरोली खाण क्षेत्र म्हणून विकसित होतं अनेक असून नवनवीन उद्योग तेथे येत आहेत, असेही गवई म्हणाले.
राज्यघटनेच्या दाखला दिला आणि आवाहन केले
भारतीय राज्यघटनेचा गाभा बंधुभाव आणि मानवता असल्याचे नमूद करत त्यांनी विद्यापीठ गीतातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील 'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे' या ओळींचा उल्लेख केला. राज्यघटनेतील मूल्ये आणि ग्रामगीतेतील विचार एकाच मानवतावादी भूमिकेचा संदेश देतात, असे ते म्हणाले.
आज सन्मानित करण्यात आलेल्या सर्व पद्मश्रींची कार्यक्षेत्रे भिन्न असली, तरी त्यांच्या कार्यामागे सेवाभावाचीच प्रेरणा आहे. सुखवस्तू आयुष्याचा त्याग करून त्यांनी समाजहितासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
प्रतिष्ठा आणि महान व्यक्तींमध्ये काय फरक पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्यांनी सुखवस्तू आयुष्याचा त्याग करून त्यांनी समाजहितासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा आदर्श स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देताना गवई म्हणाले, ''संपत्तीमुळे व्यक्ती प्रतिष्ठित होऊ शकते; मात्र देश आणि समाजासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारी व्यक्तीच महान ठरते.'' सत्कारमूर्तींचे कार्य या विचारांचे जिवंत उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.


COMMENTS