महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात आज 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चासाठी ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात आज 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चासाठी महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत.
या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत सगळेजण एक होऊन सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया, असा सल्ला दिला.
Sharad Pawar on Satyacha Morcha : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात आज 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चासाठी महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत सगळेजण एक होऊन सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया, असा सल्ला दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhan Sabha Election) जे प्रकार समोर आले, ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का बसला आहे. त्यामुळे लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावं लागेल. आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया. सगळेजण एक होऊया. मनसे (MNS) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा'चे (Satyacha Morcha Mumbai) आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.
पुढे बोलतांना, आजचा मोर्चा हा जुन्या गोष्टींची आठवण करून देत आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी मोर्चे निघाले होते. काळा घोडा आणि त्या परिसरात त्यावेळी आंदोलन पार पाडलं. आज तुम्ही जशी एकजूट दाखवली. त्यावेळी देखील अशीच एकजूट पाहिला मिळाली होती. लोकशाहीमध्ये संविधानाने जे अधिकार दिले आहेत, त्यानुसार आपण लढत आहोत. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, त्यावेळी संसदीय लोकशाहीला धक्का बसल्याचे समोर आले. उत्तमराव जानकर यांनी काही बाबी सांगितल्या. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे देखील त्यांनी सांगितले. राजकीय मतभेद असू शकतात. परंतु, आता हे विसरून आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीत आपण मताचा अधिकार जतन केला पाहिजे.
काही ठिकाणी तर अश्या तक्रारी झाल्या की, बनावट आधारकार्ड केले जात आहेत. त्यावर ते म्हणाले की पुरावे दाखवा. मात्र, हे आरोप सिद्ध करणारा डेमो ज्या व्यक्तीने दाखवला, त्याच्यावरच आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे पुरावे देतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी विचारधारा वेगळी असली तरी अनेक पक्ष सहभागी झाले आहेत. लोकशाहीसाठी आपल्याला एक व्हावं लागेल. आपण सध्या जी मतचोरी सुरू आहे ती थांबवूया. सगळेजण एक होऊया, असे शरद पवार म्हणाले.


COMMENTS