प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असतो. अनेकांच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी एक कल्पना असते, स्वप्न असतात. त्या दृष्टीन...
प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असतो. अनेकांच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी एक कल्पना असते, स्वप्न असतात. त्या दृष्टीने जोडीदाराचा शोध सुरु असतो. मुलींना त्यांच्या स्वप्नातील राजकुमार हवा असतो, मुलांना राजकुमारी. स्वप्नातला असा जोडीदार सापडल्यानंतर त्याच्यासोबत लग्न करताना डोळ्यात अनेक स्वप्न साठवलेली असतात. पण समजा लग्नानंतर समजलं की, ज्याच्याशी लग्न केलय तो एक तृतीयपंथी आहे तर?. निश्चित यामुळे मोठा झटका बसेल. मध्य प्रदेशच्या छतरपुरमध्ये राहणाऱ्या एका नवरदेवासोबत असच घडलं. त्याने मोठी स्वप्न डोळ्यात साठवून लग्न केलं. त्याने नवरी विकत घेतलेली. पण नवरीच सत्य समोर आल्यानंतर नवरदेवासह संपूर्ण कुटुंबाच्या पाायाखालची जमीन सरकली.
छतरपूरमधील एका गावात शुकरु अहिरवार आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या मुलाचं कुठे लग्न जमत नव्हतं. अनेक प्रयत्नानंतर त्यांच्या नातेवाईकाने सांगितलं की, ते छत्तीसगड येथून एक नवरी मुलगी आणू शकतात. मात्र, त्यासाठी 50 हजार रुपये मोजावे लागतील.
म्हणजे नवरी विकत घ्यावी लागेल. शुकरु अहिरवारची आर्थिक स्थिती इतकी चांगली नाहीय. पण मुलाच्या लग्नाचा विषय होता. म्हणून त्यांनी आपली तीन एकर जमीन गहाण ठेऊन 50 हजार रुपयांची व्यवस्था केली.
सोबत लग्नात 80 हजार रुपये खर्च केले ते वेगळे.मधुचंद्राच्या आधीपासूनच नवरी नवरदेवापासून अंतर राखून राहू लागली. मुलाला जेव्हा समजलं की मुलगी तृतीयपंथी आहे, तेव्हा त्याचं डोकं फिरलं. पण कुटुंब शांत राहिलं. मग, दुसऱ्यादिवशी नवरी मुलगी घरी जाण्याचा हट्ट करु लागली.
एकदिवस ती कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. रात्रभर गावच्या मागे एक डोंगर आहे, तिथे लपून राहिली. गावकऱ्यांनी सांगितलं की, कुटुंब बदनामीच्या भितीने ही गोष्ट कोणाला सांगत नव्हतं. गावकऱ्यांना संशय आल्यानंतर ते नवरीला रुग्णालयात घेऊन गेले.
तिथे ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याच समजलं. हे समजताच सगळ्यांना धक्का बसला. पोलिसांना तात्काळ बोलवण्यात आलं.पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हे लग्न आता संपूर्ण भागात चर्चेचा विषय ठरलं आहे.
मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, आमच्या मोठ्या मुलाचं आधीच लग्न झालय. पण तो आमच्यापासून वेगळा राहतो. धाकट्या मुलाच्या लग्नासाठी जमीन गहाण ठेऊन आम्ही पैशांची व्यवस्था केली. पण मुलगी तृतीयपंथी निघाली.
आता आमची संपूर्ण समाजात आणि गावात बदनामी होत आहे.


COMMENTS