छत्तीसगड उच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीत मुलींच्या हक्काबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलींना कोणत्या परिस्थि...
छत्तीसगड उच्च न्यायालयाने वडिलांच्या संपत्तीत मुलींच्या हक्काबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलींना कोणत्या परिस्थितीत वाटा मिळेल किंवा मिळणार नाही, हे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
जर वडिलांचे निधन 'हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६' लागू होण्यापूर्वी झाले असेल, तर मुलींना त्यांच्या संपत्तीत कोणताही अधिकार मिळणार नाही, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
न्यायालयाने सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये वारसा हक्क मिताक्षरा कायद्यानुसार (Mitakshara Law) निश्चित केला जाईल, जो १९५६ च्या कायद्यापूर्वी लागू होता. या कायद्यानुसार, केवळ मुलांनाच वडिलांच्या संपत्तीचे कायदेशीर वारस मानले गेले होते.
महिलने मागितला होता वडिलांच्या संपत्तीत वाटा उच्च न्यायालय रागमनिया नावाच्या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करत होते. रागमनिया यांनी त्यांच्या वडील सुधीन यांच्या संपत्तीत वाटा मागितला होता. सुधीन यांचा मृत्यू १९५०-५१ च्या आसपास झाला होता, जो १९५६ चा कायदा लागू होण्यापूर्वी अनेक वर्षांपूर्वीचा काळ आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे संपत्तीची विभागणी हिंदू उत्तराधिकार कायद्यापूर्वीच्या नियमांनुसार (म्हणजे मिताक्षरा कायद्यानुसार) होईल.


COMMENTS