आपल्या आयुर्वेदात आणि घरगुती उपचारांमध्ये अंघोळीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. दिवसाची सुरुवात किंवा थकव्यानंतर शरीराला दिलासा देण्यासाठी...
आपल्या आयुर्वेदात आणि घरगुती उपचारांमध्ये अंघोळीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. दिवसाची सुरुवात किंवा थकव्यानंतर शरीराला दिलासा देण्यासाठी अंघोळ ही उत्तम पद्धत आहे. पण केवळ पाण्याने अंघोळ केल्यापेक्षा पाण्यात काही नैसर्गिक घटक मिसळले, तर त्याचे त्वचा व आरोग्यावर अद्भुत परिणाम दिसून येतात.
१. कडुलिंबाची पाने (Neem Leaves)
कडुलिंबाला 'निसर्गातील औषध' असे म्हटले जाते.
कडुलिंबाची पाने गरम पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी अंघोळीला वापरा.
यामुळे त्वचेवरील मुरुम, खाज, इंफेक्शन आणि फोडं-फोडोऱ्या यापासून आराम मिळतो, त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.
हा उपाय आठवड्यातून दोनदा जरूर करून पहा.
२. खडे मीठ (Rock Salt)
शरीर थकल्यास किंवा अंगदुखी होत असल्यास हा उपाय फार उपयोगी आहे.
अंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाका.
मीठामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात, रक्ताभिसरण सुधारते.
स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा दूर होतो.
३. लिंबू (Lemon)
लिंबू हे नैसर्गिक क्लेन्झर आणि डिटॉक्सिफायर आहे.
अंघोळीच्या पाण्यात २-३ चमचे लिंबाचा रस टाका.
त्वचा आतून स्वच्छ, उजळ व ताजीतवानी होते.
घामाचा वास येत नाही, शरीर दिवसभर फ्रेश राहते.


COMMENTS