राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मुंबईत गेले अनेक वर्ष महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्त...
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मुंबईत गेले अनेक वर्ष महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत सरकारला गेम चेंजर ठरणारी लाडकी बहीण योजना सुरवातीपासूनच वादात आहे.
त्यावर अनेकजण वक्तव्य करत असतात. त्यातच आज खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना लाडकी बहीण म्हणजे मत विकत घेण्याची योजना, हे पगारी मतदार असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
Sanjay Raut PC: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मुंबईत गेले अनेक वर्ष महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत सरकारला गेम चेंजर ठरणारी लाडकी बहीण योजना सुरवातीपासूनच वादात आहे. त्यावर अनेकजण वक्तव्य करत असतात. त्यातच आज खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना लाडकी बहीण म्हणजे मत विकत घेण्याची योजना, हे पगारी मतदार असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. तर राज- उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर राज उद्धव भेटी नंतर काँग्रेस पक्षामध्ये अस्वस्थता नाही. आम्ही नेत्यांशी बोललो आहे. लाडकी बहीण म्हणजे मत विकत घेण्याची योजना, हे पगारी मतदार आहेत. लाडकी बहीण योजना सोडली तर महाराष्ट्रात कोणतीही योजना नाही, असा टोला त्यांनी यावेळी लावला आहे.
तर आजच्या मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर बोलतांना, जाऊद्या त्यांच्या दौऱ्याकडे कुणाच लक्ष नाही. मणिपूर मधेच विरोध होत आहे. न बोललेले बरे. काही गोष्टीवर लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे उपक्रम साजरे करतात. भारत पाक सामना यावरचे लक्ष विचलित करायचं, आम्ही फार गंभर्यान पाहत नाही. जेव्हा नग्न धिंड काढली जात होती, तेव्हा कुठे होते, तेंव्हा तोंड उघडले नाही. आता कशाला ..हे सर्व ढोंग आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
शिवाय क्रिकेट सामनावर बोलताना उद्धव ठाकरे या विषयावर आज बोलतील. जिथे जिथे शिवसेना आहे. तिथे तिथे मेरा सिन्दुर मेरा देश हा अभियान राबविणार. मोदींना पहलगाम ची आठवण करून देणार. तर युती, कॅबिनेट, अशी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहे. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत ते सर्व प्रश्न सहज सोडवू शकता. भारतात देखील लोक क्रिकेट सामना पाहणार नाही. देशात प्रखर राष्ट्रभक्त आहेत. क्रिकेटप्रेमी असले तरी ते सामना पाहणार नाही. राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही. तेथे जर लोकांचे चेहरे दिसले टीव्ही वर तर लोक जोडे मारतील. महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल हा सांगणे देखील माओवाद आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेले. तरुणांनी एकत्र येत नेपाळ मध्ये बदल घडविला…देशात महाराष्ट्रातील भ्रष्टलोकांनी काळजी घेतली पाहिजे.


COMMENTS