नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इन्स्टाग्रामवर फोटो ठेवू...
नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इन्स्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी झाल्यामुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
फिर्यादी यांची मुलगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये शिकणारा गणेश भांगरे (वय 20 रा. रामटेकडी झोपडपट्टी तपोवन), अक्षय मदन वरठे (वय 21 रामटेकडी झोपडपट्टी तपोवन) अतिष राजकुमार वैद्य (पूर्ण पत्ता माहित नाही) यांनी मृत मुलीच्या गळ्यात हात घालून काढलेला फोटो इंन्स्टाग्रामवर ठेवल्याने समाजामध्ये बदनामी झाली होती. ही बदनामी सहन न झाल्याने तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे संशयित कॉलेजमध्ये वेळोवेळी येऊन तिला आरोपी सोबत जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होते. या प्रकारामुळे मुलीवर मानसिक ताण निर्माण झाला होता.
आरोपींनी फिर्यादीच्या मुलीचे इन्स्टाग्राम युजर आयडी व पासवर्ड वापरून तिचे सोशल मीडिया खाते उघडले. त्यानंतर, तिचा व आरोपी अक्षय वरठे याचा गळ्यात हात घालून काढलेला फोटो त्या इन्स्टाग्राम खात्यातून अक्षय वरठे याच्या इन्स्टाग्रामवर पाठवून तो तिचा बॉयफ्रेंड आहे, असा मजकूरसुद्धा लिहून फोटो पोस्ट केला. त्यामुळे मुलीची समाजात आणि कॉलेजमध्ये बदनामी झाली. त्यानंतर गणेश भांगरे याने मुलीला फोन करून अश्लील आणि अपमानास्पद भाषेत शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे, तिच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवून तिचा मानसिक छळ केला. या सर्व प्रकारांच्या एकत्रित परिणामामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी आरोप केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS