Modi Warns Pakistan l पहलगाममधील भ्याड दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी आज बिहार दौऱ...
Modi Warns Pakistan l पहलगाममधील भ्याड दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी आज बिहार दौऱ्यावरून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पहिल्यांदाच सार्वजनिक भाषणात त्यांनी पाकिस्तानवर इतक्या तीव्र शब्दांत निशाणा साधला.
'ज्यांनी भारताच्या आत्म्यावर हल्ला केला, त्यांना आता कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा देणार… त्यांच्या शिल्लक राहिलेल्या जमिनीलाही मातीत गाडणार,' असे मोदींनी ठणकावून सांगितले.
बिहारच्या पाटणा येथे गॅस, ऊर्जा आणि रेल्वे क्षेत्रातील 13,483 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करताना मोदींनी (PM Narendra modi) भाषणाच्या सुरुवातीलाच पहलगाम हल्ल्यातील बळींच्या श्रद्धांजलीसाठी दोन मिनिटांचं मौन पाळलं. त्यानंतर देशभरातून उमटणाऱ्या संतापाची भावना आपल्या भाषणातून व्यक्त करत त्यांनी हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाईचे संकेत दिले.
मोदी म्हणाले, 'आज अनेक भारतीय शोकसागरात बुडाले आहेत. मृत पर्यटकांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. हा हल्ला पर्यटकांवर नव्हता, तर भारताच्या आत्म्यावर होता. ज्या दहशतवाद्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हा कट रचला, त्यांना आम्ही अशी शिक्षा देऊ की, ती त्यांच्या कल्पनाही पलिकडची असेल.'
मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा (Pakistan) स्पष्ट उल्लेख न करताच जोरदार इशारा दिला. 'अब उनकी बची-खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है,' अशा शब्दांत त्यांनी देशद्रोही शक्तींना मातीमध्ये गाडण्याचा संकल्प प्रकट केला. त्यांचा भाषणातील हा भाग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या हल्ल्यानंतर मोदींनी सौदी अरेबियातील आपला दौरा तातडीने रद्द करत देशात परत येण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री अमित शाह यांनीही घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केलं. (PM Narendra modi)
सरकारने यापूर्वीच पाकिस्तानविरोधात पाच ठोस निर्णय घेतले आहेत - ज्यात सिंधू पाणी करार रद्द, अटारी पोस्ट बंद, व्हिसा बंदी यांचा समावेश आहे.
COMMENTS