सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या ...
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या समस्यांबाबत महावितरणाने तात्काळ उपाययोजना करून ह्या प्रश्नाबाबत तातडीने मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील नागरिकांच्या वतीने वीज महामंडळाला हे निवेदन देण्यात आले असून यावेळी अरुण गुंजाळ, नामदेव शिंदे, वीरधवल साबळे, दीपक शिंदे, सुहास आहेर, प्रीतम साबळे, सुनील काळे, विजय राहणे, भाऊराव रहाणे, विलास मोरे, ताराचंद शिंदे आदींसह शेतकरी संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, रोटेशन कालावधीमध्ये प्रवरा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना अखंडित 11 तास वीज पुरवठा करण्यात येत होता, मात्र काही दिवसांपासून तो विज पुरवठा सुरळीत होत नाही. तो सुरळीत झाला पाहिजे. संगमनेर तालुक्यातील विविध सबस्टेशन अंतर्गत असलेल्या ॲग्री व गावठाण फिडरवर चार तास आपण विद्युत पुरवठा करीत आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पिके जळून चालली आहे, तरी महावितरण सर्व फिडरवर
COMMENTS