अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२५ चे आयोजन दि २१, २२, २३ फेब...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२५ चे आयोजन दि २१, २२, २३ फेब्रु२०२५ देशाची राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आले होते.
या संमेलनाची सुरुवात साहित्य ग्रंथदिंडी, चित्ररथ, कलापथक वाजत गाजत ढोल ताश्यांच्या गजरात झाली. भारतातील कानाकोपऱ्यातून आलले हजारो मराठी साहित्य रसिक प्रेमी उपस्थित राहून दिल्लीत ७० वर्षांचा इतिहास साहित्यिक व साहित्य यात्रींनी जागा केला. या संमेलन प्रसंगी उपस्थित पंतप्रधान मा . नरेंद्र मोदी हस्ते उद्घाटन झाले, स्वागताध्यक्ष मा.शरद पवार साहेब होते, प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, संजय नहार, उषा तांबे, रविंद्र शोभणे, संमेलन अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर उपस्थित होत्या.
या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज आळेफाटा,ता.जुन्नर जि . पुणे येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व मुळचे कन्नड तालुक्यातील अतिदुर्गम निसर्गभूमी जेहुर येथील रहिवासी असणारे कवी, लेखक जितेंद्र बाळू कांबळे सर यांची निवड झाली होती.
कांबळे सर यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार.
पुरस्कार: लॉटरी क्लब गुणगौरव पुरस्कार २०१९ नाशिक मालेगाव २)महाराष्ट्र सर्वधर्म संभव पुरस्कार २०२१पुणे ३)महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार २०२२पुणे ४)महाराष्ट्र योद्धा शिक्षक रत्न पुरस्कार २०२५पुणे ५)राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा साहित्यरत्न पुरस्कार २०२५पुणे ६)साहित्यरत्न जीवन शिखर आयकॉन अवॉर्ड २०२५ अहिल्यानगर इतर पुरस्कार मिळाले आहेत.
राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथील श्रीमंत सयाजीराजे महाराज गायकवाड सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज विचारपीठावर जितेंद्र कांबळे सरांनी जीवनातील संघर्ष कथा खंत व्यक्त केली आहे, यश कथा कवितेतून आई वडील म्हणजे खरे आपल जीवन घडणारे जगातले पहिले विद्यापीठ आहे, मोठा भाऊ माझा पहिला मित्र आहे अश्या आनंदमय भावार्थ सादरीकरण कवितेतून सांगितलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य काव्य संमेलन दिल्ली प्रसंगी रसिकांनी यश कथा या कवितेनं सर्व उपस्थितांची मने जिंकली .जितेंद्र कांबळे सर यांचे प्रकाशित काव्य काव्यसंग्रह निवडक कविता माझी आई प्रतिनिधी काव्यसंग्रह पुणे १) (अनाथ माय) २) ज्ञानगंगा नवयुगाच्या तरुणा १)लेखणीचे मोल भिडेवाडा बोलला काव्यसंग्रह १) देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा कस्तुरबा काव्यसंग्रह, १) लाल परी २)बाप म्हणजे काय ३)यश कथा लवकरच १ते ४ विद्यार्थ्याच्या पाठ्यक्रमात कविता ग्रंथालय साठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.तसेच अनेक लेख प्रसिद्ध आहेत.छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ कवी कट्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे संस्थापक अभिनेते डॉ.शरद गोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार ,युवराज नळे डॉ.पोपेरे, संजय आवटे {रामदास मोरे तुकाराम महाराज वंशज] यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक यशवंत घोडगे जुन्नर, डॉ.विजय पोपेरे अकोले, नितीन पाटील सोलापूर, हेमंत चिकणे, हर्षदा गुळमिरे, सुषमा आलेकर, सुवर्णा तेली, विना होरा, अलका नाईक मुंबई, लक्ष्मण हेंबाडे, आदेश फुलगे, संदीप तोडकर, तुकाराम जेगोले, माणिकराव गोडसे तुकाराम मोरे, हेमंत बोरसे, तोरस्कर, सुवर्णा वाघमारे यांच्यासह समवेत महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव भागातून आलेल्या निमंत्रित कवीच्या कविता सादर झाल्या. दि.२१ ते २३ फेब्रुवारी ग्रंथदिंडी, मुलाखत, परिसंवाद, लोकसाहित्य, कविसंमेलन, कवी कट्टा, एकपात्री नाटृय सादरीकरण झाले. खासदार सुप्रिया ताई सुळे, मा.सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री मा.अजितपवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, मा.विजय दर्डा लोकमत वृत्तपत्र साहित्य संमेलनासाठी भारतातील असंख्य मराठी साहित्य प्रेमी साहित्य यात्री उपस्थित होते.
COMMENTS