मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या महिला निकषात बसणार नाही आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या महिला निकषात बसणार नाही आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे.
याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली आहे. दरम्यान आता योजनेच्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2100 रुपये दर महिन्याला जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती, त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या मार्चपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
महिलांची तक्रार आल्यास पुन्हा पडताळणी
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलेच्या मालकीची कार आहे. तसेच ज्या लाभार्थी महिलेचं आधार कार्डला एक नाव आणि बँक खात्यामध्ये दुसरं नाव आहे, अशा महिलांची तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल, मात्र जीआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं तटकरे यांनी म्हटलं होतं.
योजना सुरुच राहणार
तटकरे यांच्या या माहितीनंतर योजनेबाबत चर्चेला उधाण आलं होतं. अखेर यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मोठी अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. शासनाने कोणत्याही नियमात बदल केलेला नाही, सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत योजना लागू राहणार आहे, असं निलम गोर्हे यांनी म्हटलं आहे.
मार्चपर्यंत 2100 रुपये मिळण्याची शक्यता
दरम्यान 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळू शकतात.
अधिक वाचा.
शरद पवार अन उद्धव ठाकरे गटातून वाढलं आऊटगोइंग; एकनाथ शिंदेकडून मोठा धक्का!
COMMENTS