मुंबई : वडील शेतकरी होते. वडील कुटुंबात मोठे असल्यामुळे घरातील कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोठा मुलगा जैनंद हा ५- ६ वर्षाचा असताना...
मुंबई : वडील शेतकरी होते. वडील कुटुंबात मोठे असल्यामुळे घरातील कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोठा मुलगा जैनंद हा ५- ६ वर्षाचा असताना तो गावी मरण पावला. अशी घटना घडत असतानाच वडिलांनी सन १९५६ च्या काळात मुंबई गाठली. रेल्वेत नोकरी मिळाली. वडील नथुजी यांना ४ मुले होती. दोघा ही उभयतांना मुलीची आवड होती पण मुलगी झाली नाही. मुलांना लहानाचं मोठं करणं त्याच शिक्षण यातच वेळ व पैसा गेला. आई लक्ष्मीबाई वडील नथुजी हे दोघेही अशिक्षित होते त्यांचे विचार हे सुशिक्षित असल्यामुळे मुलांचं भवितव्य उज्वल झालं. आपल्या मुलांनी सैन्य दलात भरती व्हावं व देशाची सेवा करावी हि त्यांची इच्छा होती प्रयत्न केले पण यश मिळाले नाही.
नागरी सरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून सामील झाले. ना. स. द. अनेक प्रशिक्षण घेऊन प्रमाण पत्र मिळवलेले आहेत. ना स द. या मध्ये मा. उपविभागीय अधिकारी (मानसेवी अधिकारी ) वाशी येथे कार्यरत होते. निवडणूक कामी विशेष पोलीस अधिकारी, गणेश विसर्जन, मुंबई महानगर पालिका संप शिळफाटा इमारत दुर्घटना, अशा अनेक महत्वाच्या कामी आपले कर्तव्य बजावलेले आहे . महा ई - सेवा केंद्र (महाराष्ट्र शासना चा अंगीकृत उपक्रम) असल्यामुळे अनेक शासकीय योजना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दाखले, नोकरी, माहिती व मार्गदर्शन शिबीर यामुळे यामुळे लोकांना त्याचा लाभ घेता आला. व जनतेचा विश्वास संपादन केला.
सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात कार्य चालूच असताना आपल्या जिवनात काही तरी महत्वाचे स्थान असावे कि जेणेकरून आपल्याकडून कोणत्याही समाजातील लोकांचा फायदा होईल या उदेशाने शिक्षण सुरु ठेऊन पदवीधर झाले आज अँड. अरुण नथुजी शिरसाट या नावाने ओळखले जात आहे. पैसा हा काही सर्वस्व नाही जगण्या पुरता पैसा माणसा कडे असला म्हणजे बस ! आपण समाधानी आहोत एवढेच महत्वाचे असते हा त्यांचा विचार !
सांस्कृतिक सामाजिक जनजागृती कला क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे राज्यातील आंबेडकरी सामाज्यात त्यांचा मोठा संपर्क आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर . समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने आम्हास ऊर्जा मिळाली हि ऊर्जा घेऊन मी माझे पुढील आयुष्य हे समाज्याच्या हितासाठी ना कोणत्या जातीचा ना कोणत्या धर्माचा ना पंथाचा मानवतेच्या दृष्टीकोनातून समर्पित करण्याचे ठरविले आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मार्फत महाराष्ट्र राज्य शासनाने सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, कला क्षेत्रात अग्रेसर राहून अतुलनीय कार्य करणाऱ्या नवी मुंबईतील वकिली क्षेत्रात असणारे अँड . अरुण नथुजी शिरसाट यांना समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव मा. सुमंत भांगे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यांच्या समवेत उप सचिव रवींद्र शिवाजी गोरवे साहेब कक्ष अधिकारी मा. पाबळे साहेब आदी. मान्यवरांसह महाराष्ट्रातील तमाम समाजसेवक उपस्थित होते. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मा. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब मा. गणेशजी नाईक साहेब आमदार, मा. मंदाताई म्हात्रे आमदार मा. संदीपजी नाईक साहेब भा. ज. पा ज़िल्हाध्यक्ष, संजीवजी नाईक साहेब मा. खासदार मा. सी व्ही रेड्डी साहेब या सर्वांचे मनोपुर्वक आभार व धन्यवाद, डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे समाजामध्ये उत्साह आहे.
COMMENTS