राज्यभरात जवळपास सर्वच नागरिकांना दोन इमर्जन्सी अलर्ट (Emergency Alert) आले. नेमका हा काय प्रकार आहे?. असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आत...
राज्यभरात जवळपास सर्वच नागरिकांना दोन इमर्जन्सी अलर्ट (Emergency Alert) आले. नेमका हा काय प्रकार आहे?. असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता यात घाबरण्यासारखे काहीही नसल्याचे समोर येत आहे.
आपल्या फोन मध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर सुविधा सुरु करण्यासाठी केलेली उपाययोजना आहे.
नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. कधी भूकंप, त्सुनामी, महापूर, चक्रीवादळ, दुष्काळ, आणि इतर सर्व प्रकारच्या आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत योग्य ती माहिती मिळणे गरजचे असते. आपत्तीपूर्वी नागरिकांना माहिती मिळाल्यास त्यावर खबरदारी घेणे सोपे होते. यासाठी क्रेंद्र शासनाने मोबाईल कंपन्यांना निर्देश दिले होते.
एप्रिलमध्ये सरकारने मोबाईल कमान्यांना फोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर देणं बंधनकारक केलं होत. सरकारच्या आदेशांनंतरही स्मार्टफोन कंपन्यांनी फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर न दिल्यास त्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार होती. म्हणून लगेच सर्व कंपन्यांनी हे फिचर आणले होते व त्यामुळेच हा इमर्जन्सी अलर्ट मिळाला होता.
या अलर्ट च्या माध्यमातून मोबाईल मधील इमर्जन्सी अलर्ट फिचर या सेटिंग मध्ये जात येते. तिथे हि सेटिंग सुरु केल्यास कंपन्यांकडून आपत्कालीन परिस्थितीत येणार इमर्जन्सी संदेश तात्काळ प्राप्त होण्यासाठी मदत होईल. अचानक आलेल्या इमर्जन्सी अलर्टमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
COMMENTS