जालना : मूल होत नाही या रागातून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी-मंठा भागात घडली आहे. पोलिसांनी पाच दिवसांत या ...
जालना : मूल होत नाही या रागातून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील तळणी-मंठा भागात घडली आहे. पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
मोटारीला आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना 24 जून रोजी घडली होती.
मात्र, आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. या कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती. मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने पतीनंच हे भयंकर कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सविता अमोल सोळंखे असे मृत महिलेचे नाव आहे. दोघांचे लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र, त्यांना मुलबाळ होत नव्हते. अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास देत असे. शिवाय, सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती. याचाच राग मनात धरून पती अमोलने पत्नीला कारमध्ये जिवंत जाळले आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS